Triple Murder : चंद्रपूर जिल्ह्यात तिहेरी हत्याकांड

Triple Murder : चंद्रपूर जिल्ह्यात तिहेरी हत्याकांड

 Crime story's

चंद्रपूर/नागभीड - चंद्रपूर जिल्ह्यात सध्या हत्येचे सत्र सुरूच आहे, 3 मार्च रोजी नागभीड तालुका तिहेरी हत्याकांडाने हादरला, पतीने 2 मुली व पत्नीची कुऱ्हाडीने वार करीत हत्या केली. Triple murder in chandrapur

Crime news



सदर हत्याकांड हे मध्यरात्री घडलं असा अंदाज वर्तविण्यात आला आहे, नागभीड तालुक्यातील मौशी येथे 50 वर्षीय अंबादास तलमले हे आपल्या कुटुंबासह राहत होते. Crime 



काही दिवसापासून तलमले कुटुंबात कौटुंबिक कलह सुरू होता, त्या कलहाचे रूपांतर भीषण हत्याकांडात बदलले, अंबादास यांनी 20 वर्षीय प्रणाली व 12 वित शिकणारी लहान मुलगी तेजु व पत्नी अल्का यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले, या हल्ल्यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. Brutal crime



नागभीड पोलिसांनी या प्रकरणी आरोपी अंबादास यांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

विशेष बाब म्हणजे ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा अंबादास यांचा मुलगा बाहेर गेला होता, तो घरी असता तर त्याच्या जीवाचे बरे वाईट झाले असते.

चंद्रपूर जिल्ह्यात नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत हत्येच्या तब्बल 12 घटना घडल्या आहे.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने