अतिक्रमणाची तक्रार का केली म्हणून महिलांनी काढली धिंड

अतिक्रमणाची तक्रार का केली म्हणून महिलांनी काढली धिंड

छत्रपती संभाजी नगर
कन्नड - अतिक्रमनाची तक्रार का दिली म्हणून मकरणपुर येथील सामाजिक कार्यकर्त्यांची गावात महिलांनी मारहाण करीत धिंड काढली.
या प्रकरणात 15 महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Encroachment complent


कन्नड तालुक्यातील मकरणपुर येथील माजी सरपंच विनायक सोनवणे व सरपंच सना असलम शेख यांची सामाजिक कार्यकर्ते RTI कार्यकर्ता 34 वर्षीय बापू शांताराम गवळी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अतिक्रमण बाबत तक्रार दिली होती.


आमची तक्रार का दिली म्हणून सरपंच व माजी सरपंच यांच्या सांगण्यावरून बापू गवळी यांना गावातील महिलांनी पकडले व चपलेने मारहाण करीत धिंड काढली.

याबाबत बापू गवळी यांनी कन्नड शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, गवळी यांच्या तक्रारीची दखल घेत पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी तब्बल 15 महिलांवर गुन्हे दाखल केले आहे.

फिर्यादी बापू गवळीवर एका महिलेला जातीवाचक शिवीगाळ दिली म्हणून अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने