Shootouts news
पालघर - जयपूर वरून मुंबईला जाणाऱ्या एक्सप्रेस मध्ये रेल्वे सुरक्षा जवानाने धावत्या रेल्वेत अंधाधुंद गोळीबार केला, या गोळीबारात ASI सहित 4 प्रवाश्यांचा मृत्यू झाला.
सदर घटना आज 31 जुलै ला पहाटे 5 वाजताच्या सुमारास घडली, रेल्वे सुरक्षा जवानाने आपल्या स्वयंचलित रायफल मधून गोळीबार केला.
गोळीबार करणाऱ्या पोलीस हवालदाराला मीरा रोड जवळ अटक करण्यात आली आहे, गोळीबार करणारा पोलीस मानसिक तणावाने त्रस्त असल्याची माहिती पुढे आली आहे.
मात्र त्या पोलिसाने गोळीबार का केला याबाबत अजून काही माहिती मिळाली नाही, गोळीबार केल्यावर आरोपीने दहिसर रेल्वे स्टेशनवर उडी घेतली होती.