Pune crime news
पुणे - रोजच्या भांडणाला कंटाळून डॉक्टरने पत्नी व मुलांचा खून करून स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यात उघडकीस आली आहे.
जिल्ह्यातील दौंड येथील वरवंड परिसरात 42 वर्षीय डॉक्टर अतुल शिवाजी दिवेकर हे आपल्या कुटुंबासाहित राहत होते, मात्र अतुल यांचं दररोज पत्नी 35 वर्षीय पल्लवी दिवेकर यांच्याशी भांडण व्हायचे, या भांडणामुळे डॉक्टर अतुल नेहमी अस्वस्थ रहायचे.
नेमकं काय घडलं?
अतुल हे पशुवैद्यकीय डॉक्टर होते तर त्यांची पत्नी शिक्षिका होती, मंगळवारी अतुल घरी होते त्यावेळी पुन्हा पत्नीसोबत त्यांचे भांडण झाले, रोज होत असलेला त्रास कुठेतरी थांबला पाहिजे अशी बाब डॉ. अतुल च्या मनात नेहमी येत असे.
मंगळवारी झालेल्या भांडणात अतुल चा राग अनावर झाला त्यांनी पत्नी पल्लवी चा गळा दाबून खून केला.
मुलांचा दोष काय?
पत्नी ला मारल्यावर मी जेल मध्ये जाणार तर मुलांचं काय होणार? याबाबत डॉ. अतुल चिंतेत पडले त्यांनी जगताप मळ्यात असलेल्या विहिरीत 11 वर्षीय अद्वित व 7 वर्षीय वेदांतीका ला ढकलून त्यांची हत्या केली, आणि स्वतः घरात गळफास घेत अतुल ने आत्महत्या केली.
सुसाईड नोट मध्ये काय?
घडलेल्या या घटनेला मी सर्वस्वी जबाबदार आहो, आमच्यानंतर मुलांचे काय होणार म्हणून त्यांना संपविले, मुलांचे मृतदेह विहिरीत आहे. आयुष्याला कंटाळून मी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
या घटनेमुळे दौंड परिसरात शोककळा पसरली आहे.