50 वर्षीय महिलेची भर रस्त्यात हत्या

50 वर्षीय महिलेची भर रस्त्यात हत्या

Crime story's
केरळ - सर्वात क्रूर श्रद्धा वालकर हत्याकांडाने संपूर्ण देश हादरुन गेला, live in relationship मध्ये राहणाऱ्या श्रद्धाने आफताब ला लग्न करण्याची मागणी केल्याने तिची हत्या करीत मृतदेहाचे 35 तुकडे केले. Murder crime
अशीच एक हादरविणारी घटना तिरुअनंतपुरम येथे घडली आहे.
मागील 12 वर्षांपासून live in relationship मध्ये राहणारे जोडपे अचानक एकमेकांच्या दूर जाऊ लागले, प्रियकराला प्रेयसी आता दूर जात असल्याचा भास झाला, त्याने रागाच्या भरात प्रेयसीवर भर रस्त्यात मानेवर चाकूने वार केले या हल्ल्यात प्रेयसीचा मृत्यू झाला. India crime news
46 वर्षीय राजेश व 50 वर्षीय सिंधू एकमेकांवर अतोनात प्रेम करायचे ते दोघे 12 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये होते, मात्र काही काळापासून दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता, महिन्या भरापूर्वी दोघे वेगळे झाले.
सिंधू ही आपल्यापासून दूर जात आहे असे राजेश ला वाटायचे, दोघे वेगळे झाल्यावर राजेश पुन्हा सिंधू ला आपल्या आयुष्यात परत आणण्याचा प्रयत्न करीत होता मात्र सिंधू ने त्याला नकार दिला.
राजेश ने सिंधू ला संपविण्याचा निर्णय केला व तिरुअनंतपुरम मधील पेरूरकाडा येथील रस्त्यावरून जात असताना राजेश ने सिंधू ला रस्त्यात गाठले, सिंधू ने पुन्हा नकार दिल्याने राजेश ने चाकू काढला व तिच्या मानेवर 3 वार केले.
सदर प्रकार नागरिकांनी बघितला असता तात्काळ सिंधू ला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारा आधी तिचा मृत्यू झाला.
पोलिसांनी राजेशला अटक करीत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने