कचरा टाकण्याच्या वादातून युवकाची हत्या

कचरा टाकण्याच्या वादातून युवकाची हत्या

Crime story's
हिंगोली - राज्यात आजकाल तरुणाईचा राग हा सहनशक्तीच्या बाहेर जात असल्याने गुन्हेगारी वृत्तीत वाढ होत आहे. Hingoli crime
असाच एक किरकोळ वाद हिंगोली मध्ये घडला, कचरा टाकण्याच्या वादातून एका 25 वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली. Maharashtra crime news
सावरखेडा तालुक्यात 25 वर्षीय सुधाकर आंभोरे व रामेश्वर मारोती हरण या दोघांमध्ये किरकोळ वाद सुरू होता.
शनिवारी कचरा टाकण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला, काही वेळात वाद टोकाला पोहचताच, हाणामारी झाली.
रागाच्या भरात रामेश्वर ने चाकू काढत सुधाकर च्या पोटात खुपसले, नागरिकांनी मध्यस्थी करीत वाद सोडविला, त्यानंतर जखमी सुधाकर ला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र रक्तस्राव झाल्याने रविवारी सुधाकरचा मृत्यू झाला, बासबा पोलिसांनी गुन्हा दाखल करीत रामेश्वर ला ताब्यात घेतले.
मृतक सुधाकर यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगी आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने