प्रेमासाठी वाट्टेल ते.....प्रेयसीला भेटण्यास मनाई केली आणि प्रियकराने केले खूनी तांडव

प्रेमासाठी वाट्टेल ते.....प्रेयसीला भेटण्यास मनाई केली आणि प्रियकराने केले खूनी तांडव

Crime story s
छत्तीसगड - प्रेम म्हणजे प्रेम असतं पण आता आधीच्या प्रेमासारखं सर्व काही सेम नसतं अशी परिस्थिती आज प्रेमी जोडप्यांची झाली आहे.
प्रेमासाठी वाट्टेल ते करणारे आज त्यांना कशाचेही भान राहत नाही, यासाठी ते काहीही करायला तयार असतात.
असाच एक भयावह प्रकार बिलासपूर येथे घडला आहे, शाळकरी मुलीवर प्रेम करणाऱ्या एका युवकाने क्षुल्लक कारणावरून शाळेच्या मुख्याध्यापकांची हत्या केली. Brutal murder
कारण फक्त एवढेच की मुख्याध्यापक याने त्या प्रेमविराला प्रेयसीला भेटण्यास मनाई केली होती, इतकेच नव्हे तर त्याला शाळेच्या आवारात भटकण्याची ही मनाई मुख्याध्यापक यांनी केली होती. पण ही मनाई मुख्याध्यापक यांच्या जीवावर बेतेल असं कुणालाही वाटलं नव्हतं.
तारबहार भागातील सरकारी शाळेत मुख्याध्यापक 52 वर्षीय प्रदीप श्रीवास्तव हे पचपेडीच्या शाळेत कार्यरत होते. Principal murde
रात्री कुणीतरी घरी आलं अशी चाहूल श्रीवास्तव यांना लागल्याने ते बघण्यासाठी बाहेर गेले असता त्यांच्यावर प्रेमवीर उपेंद्र कौशिक यांनी श्रीवास्तव यांचेवर चाकूने वार केले, दरवाज्याच्या आवाज ऐकताच श्रीवास्तव यांची पत्नी झोपेतून जागी झाली त्यानंतर त्यांनी दार उघडलं असता श्रीवास्तव हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते, त्यांनी आरडाओरडा केला असता शेजाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात नेले मात्र तोवर त्यांचा मृत्यू झाला. India crime news
याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली असता पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला, त्यावेळी त्यांना त्या भागात उपेंद्र कौशिक फिरताना आढळला त्याला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले असता मुख्याध्यापक श्रीवास्तव हे माझ्या प्रेयसीला त्रास देत होते, तिच्यासोबत मला ते भेटण्यास मनाई करीत होते म्हणून मी त्यांची हत्या केली असे त्याने कबूल केले.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने