बायको सोडून गेली, सतत वडिलांचे टोमणे, मुलाने उचलले टोकाचे पाऊल

बायको सोडून गेली, सतत वडिलांचे टोमणे, मुलाने उचलले टोकाचे पाऊल

Crimestorys
अंबरनाथ - बायको सोडून गेल्यावर नवऱ्याला सतत टोमणे मारणारे व्यक्ती हे सहसा बाहेरील असतात मात्र जेव्हा उठता बसता घरचे व्यक्ती टोमणे मारत असतात तर त्याचा असहनिय व न झेपणारा त्रास हा वाढत जातो, मात्र त्या त्रासाला कंटाळून एकाने वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. Ambarnath crime


ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात राहणारे प्रकाश सूर्यवंशी हे ऑटो चालवत कुटुंबाचा गाडा चालवितात त्यांना 3 मुले आहे, मात्र काही दिवसांपूर्वी त्यांची पत्नी प्रकाश ला सोडून गेली होती. Maharashtra crime
त्या दिवसापासून प्रकाश चे वडील देविदास सूर्यवंशी हे प्रकाश ला सतत बायको सोडून गेली असल्याबाबत टोमणे मारायचे.
त्यामुळे प्रकाश हा लवकर कामावर जात होता, रविवारी रात्री प्रकाश कामावरून आला त्यांनतर तो जेवायला बसला होता, मात्र नेमकं त्याचवेळी वडील हे प्रकाश ला टोमणे मारायला लागले, त्यामुळे प्रकाश चा राग अनावर झाला त्याने लाकडी फळीने वडिलांना मारहाण करणे सुरू केले.
या मारहाणीत देविदास यांचा मृत्यू झाला, शिवाजीनगर पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी प्रकाशला अटक केली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने